Tuesday, November 7, 2023

Four questions about healthcare

Qestion 1: How healthcare quality is decided by patients?
Answer : Quality of healthcare service is decided on the basis of lot of factors which differ as per set up of services.


1. For hospital set up- Immediate availability of dr and fast conveying of situation/plan of action to relatives/patient


2. For opd- listening ( empathy) and talking to patients. Spending time with patient.


3. For ICU set up-  there are lot of factors like
          (a) Giving information about cost,
          (b) Frequent correct information  
                about  patients         
          (c) Allowing relatives to  see & touch
                serious patients. 
          (d) Telling pt's condition in clear &                        understanding  language with
                eye to eye contact.

4. It's surprising but true that the correct diagnosis & treatment comes as a last parameter while assessment of good health care. But it matters though in  later stage.

5. For corporate hospitals- It's always cost cost and cost. Infrastructure, good drs and urgent services all are there, but huge cost. The cost of healthcare in corporate hospital decides it's quality.


Question 2: How do patients trust doctor?

Answer : Patients trust doctors by his behaviour and approach to patient's illness.

1.honest and transperant opinion. Saying Something like this to patients whenever needed-
  • "this is not area of my expertise"
  • " I am not sure about your diagnosis & I need to do more tests"
2. Sometimes, a doctor cancelling his  case paper & returning fees after examining patient,if  it's not his area of expertise.  Such acts increase trust.


3. Whenever doctor advises investigations,  never tell them to do it at perticular lab . Just give a note about which investigations to do. Let patient themselves find out about lab. This again increases trust.


4. A doctor should always refer to other specialist ( if needed), who is excellent in his work. Referral should not be based on personal relationships. This ensures best possible treatment for patient and his improvement ensures faith in doctor.


5. A doctor should not be critical about generics. He should not  insist on perticular brands or specific drug shop. This creates mistrust in mind of patients. Generics with its pro & cons are part & parcel of Indian healthcare industry. Patient should be allowed to take any brand of prescribed medicines. It's his choice. If he is not tolerating pills or not getting desired effects, then doctor may suggest to take his prescribed brand as an option to patient.

6.A doctor should not blindly refuse reports from outside labs or radiologist.

7.A doctor should not randomly comment on drugs/treatment of alternative medicine systems. India has its own ministry of Aayush. So, it's parallel official stream of healthcare. One need to respect that even if in principle, one may not agree with it.


Question 3: What acts lead to distrust in patients?
Answer :
  • No eye to eye contact
  • No empathy
  • Casual body language
  • Repeated investigations
  • Insisting on own pharmacy/brands
  • Costly drugs
  • Refusing substitute drugs
  • Arrogent behaviour



Question 4 : How a doctor should  persuade patients to comply with treatment?
Answer : 

  • Counseling in every visit for regular drugs
  • Checking compliance every visit
  • Showing geniune interest in well being of patients
  • Acting as mentor cum companion in his journey to well being
  • Giving hope and objectively showing patients the small improvement which they miss


 Dr. Praveen Kulkarni. Miraj.

Sunday, May 14, 2023

आमची केसरी टूर्सतर्फे अमृतसर, धरमशला, डलहौसी ट्रीप.

 केसरी टूर्स तर्फे एप्रिल २०२३ मध्ये आम्ही अमृतसर, डलहौसी, धरमशाला अश्या ३ ठिकाणी ट्रीपसाठी गेलो होतो. मुंबईहून ते अमृतसर असे प्लेन होते. प्लेन सकाळी लवकर  होते. त्यादिवशी गृहमंत्री मुंबईत असल्याने ट्रॅफिक जॅम असणार, म्हणून आम्ही आदल्या दिवशीच मुंबईत मुक्काम करायचे ठरवले. टर्मिनल १  जवळ असलेल्या एअरक्राफ्ट इंटरनॅशनल या हॉटेल मध्ये एक रात्र राहिलो, ३५००/- भाडे, छान हॉटेल, १० मिनिटात चालत टर्मिनल १ मध्ये माणूस पोचतो. गरज असल्यास अवश्य राहावे असे ठिकाण. आमचे  गो फर्स्टचे विमान होते. (आता सध्या ती एअरलाईन्स बंदच पडली आहे). पण त्यावेळी सुद्धा सगळ्या गो फर्स्ट फ्लाइट्स उशिरा होत्या. (खरतर  "गो लास्ट" म्हणावे अश्या...) 


आमची फ्लाईट नंतर लेट होऊन  साडेदहाची झाली. त्यादरम्यान गेट १ वर आम्ही क्यू मध्ये उभारलो. आम्हाला गो फर्स्टच्या बसमध्ये चढवले आणि तिकडे विमानाकडे नेऊ लागले. १०-१५ मिनिटे झाली तरी बस आपली विमानतळावर चाललीच आहे. काही कळेना. आजूबाजूला इंडिगो, स्पाइस जेट वगैरे विमाने दिसत होती. मध्येच भंगारात निघालेले किंग फिशर सुध्दा दिसले. पण आमची बस अजून थांबायची काही चिन्हे दिसेनात. मला शंका आली की  गो फर्स्ट आम्हाला  बसनेच अमृतसरला नेते की काय ? काही वेळाने तर विमानतळाचे कुंपण दिसू लागले, मग मला खात्रीच पटली की हा बस ड्रायव्हर आता कुंपण तोडून डायरेक्ट नॅशनल हायवेवर बस नेणार......पण नाही. मध्येच एक गो फर्स्टचे विमान दिसले. मग हुश्श झाले. विमानात आम्ही आत जाऊन बसलो. गंमत म्हणजे, चालू झाल्यावर ते विमान सुद्धा बराच वेळ विमानतळावर फिरले. पण, बसच्या अनुभवामुळे आम्हाला हे लोक जरा "मंद" आहेत हे समजले होते. त्यामुळे पायलट आम्हाला रस्त्याने न नेता विमान उडवूनच अमृतसरला पोचवेल याची खात्री होती. आमच्या तिकिटावर एक "मील" फ्री होते. अनपेक्षितरित्या हे चक्क चांगले होते चवीला. नाहीतर, विमानातील खाद्यपदार्थ सगळे थंड आणि बेचवच असतात. दुसरे आश्चर्य म्हणजे हवाई सुंदरी या बऱ्याचशा माणसाळलेल्या होत्या. म्हणजे इतर विमान कंपन्यांच्या असतात तश्या प्लास्टिक चेहऱ्याच्या आणि कोरड्या भाषेत बोलणाऱ्या, वावरणाऱ्या हवाई सुंदरी नव्हत्या. ह्या मुली प्रवाशांशी आपुलकीने बोलत होत्या. हे जरा वेगळेच होते. 

विमानप्रवास संपल्यावर आम्ही अमृतसरमध्ये जेवण घेऊन डलहौसी कडे रवाना झालो.आमच्या बरोबरच वीणा वर्ल्डची सुद्धा याच भागाची सहल करणारी बस होती. वाटेल चहा कॉफी ब्रेक साठी दोन्ही बस एकाच ठिकाणी थांबत. त्यावेळी केसरी आणि वीणा या २ टूर कंपनीच्या टूर ऑपरेटर स्टाफ मधील मैत्री जाणवली. भले,आपल्याला असे वाटते, की या कंपन्यामध्ये जोरदार स्पर्धा असणार, पण तसे काही नाही. अतिशय मस्त गप्पा मारत ही स्टाफ मंडळी चहा पित होती. दुपारी ३ वाजता अमृतसरहून निघून, रात्री साडे आठ- नऊच्या सुमारास आम्ही डलहौसीच्या हॉटेलमध्ये पोचलो. दिवसभरच्या प्रवासाने दमून गेल्याने जेऊन झोपलो. 

सकाळी उठून "साईट सीइंग"(उर्फ स्थलदर्शन) सुरू केले. एक स्मारक, खज्जियार आणि लेक असा प्लॅन होता. भगतसिंगांच्या काकांचे स्मारक दाखवले. तेही हुतात्मा होते. पण एक छोटा पुतळा आणि कट्टा यापलीकडे तिथे बघण्यासारखे काही नाही. तिथे जाताना, गाडीतून क्षितिजावर मस्त पांढऱ्या शुभ्र हिमालयाच्या पर्वत रांगा दिसतात. खूप छान दृश्य आहे ते. तिथे रस्त्यात काही फोटोग्राफर असतात. तुमचा "मागच्या हिमालयाच्या बॅक राऊंड " घेऊन फोटो काढतो असे सांगून फोटो काढतात.४०-१०० रुपये वाया. काहीही नीट फोटो येत नाहीत. त्यापेक्षा स्वतः मोबाईलचे फोटो बरे येतात. ( हा माझ्या नोकिया 7 प्लस मधून काढलेला. फोटोग्राफ ने काढलेल्या फोटोत पोट्रेट फोटो सारखी फक्त माणसेच दिसतात,ही अशी पार्श्वभूमी येत नाही ) 



तिथून खज्जीयार येथे गेलो. याला "मिनी स्वित्झर्लंड" म्हणतात कारण तिथल्या  निसर्गाचे विहंगम दृश्य. इथे खाण्यापिण्याची चंगळ आहे. फोटोग्राफर आहेत. पॅराग्लायडिंग आहे. वॉकिंग ट्रॅक आहे. निवांत बसायचे असेल तर सावलीत खूप बाक आहेत. इथे खूप शांत आहे.


खज्जीयार येथे या मस्त निसर्गासमोर बसल्यावर शांत वाटते. इथे १ तास फक्त बसले तरी आयुष्य ५-६ वर्षांनी वाढेल असे वाटते. हिरवळ, त्यावर फिरणारी पाखरे, तलाव, मागे हिरवीगार झाडी, निळे आकाश, पांढरे ढग, थंड हलकासा वारा...हे सगळे सकाळी ११ वाजता आपण बघत आहोत आणि अनुभव घेत आहोत ह्या कल्पनेने फारच छान वाटते. पुढे काही काम नाही आणि असेच अजून तासभर इथेच फिरायचे आहे ह्या विचाराने खूप बरे वाटते. जवळच नवीन चालू झालेले आयटीसीचे हॉटेल होते. तिथे जेवलो. अतिशय मस्त चवदार जेवण. गरमागरम भजी थंडीत खायला छान वाटली. तिथून लेककडे गेलो. हिल स्टेशन म्हणजे तलाव हवाच. आणि त्यात बोटिंग आलेच या नियमाने केसरीने आम्हाला तलावात फिरवले.  प्रत्येक हिल स्टेशनला एक तलाव आणि त्यात पर्यटकांना फिरवणे ही टुरिस्ट कंपन्यांची " fill in the blacks" (गाळलेल्या जागा भरा) अशी एक ॲक्टीविटी असावी. लाईफ जॅकेट घालून बोटीतून फिरणे. एक अत्यंत नॉन स्पेसिफिक ॲक्टिविटी. स्किप करण्यासारखी. भर दुपारच्या उन्हात मस्त चांगले भरपेट जेवल्यानंतर एसी रूममध्ये मस्त ताणून झोप  घ्यावी हा खरंतर बेस्ट प्लॅन झाला असता . पण दुपारी  ३-४ भर उन्हात  तलावात फिरणे नशिबात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी डलहौसी मधून निघालो ९ वाजता. वाटेत जेवलो.आणि ६ वाजता संध्याकाळी धरमशाला मध्ये पोचलो. भयंकर कंटाळवाणा प्रवास.  बसमध्ये जुनी हिंदी गाणी लावलेली, त्यामुळे बरे झाले. त्यात केसरी टूर्सने आधीच आपल्या मोबाईलमध्ये गाणी, व्हिडिओ वगैरे लोड करून ठेवा कारण खूप रोड जर्नी आहे असे सांगितले होते म्हणून सर्वजण तसे मानसिकरीत्या तयार होतेच. संध्याकाळी धरमशाला मध्ये पोचलो. इकडे सगळ्या हॉटेलमध्ये बुद्ध दिसतात. फोटो.. मूर्ती...खूपच प्रभाव आहे इकडे



 धरमशाला हे मोठे शहर आहे. एअरपोर्ट, क्रिकेट स्टेडियम आणि मोठ्या ब्रँड्सची हॉटेल्स. शहरातून कुठूनही बर्फाच्छादित शिखरे दिसतात. इथे सकाळी आम्ही स्वयंभू शंकराचे मंदिर आणि त्यामागे असलेला छोटा धबधबा पाहिला.खरंतर छोटी नदी वाहते आहे. इथे शंकराने अर्जुनला गांडिव धनुष्य दिले अशी आख्यायिका आहे. नंतर चिन्मय तपोवन आश्रमात गेलो. एक शांत सुंदर आध्यात्मिक निसर्गरम्य परिसर. तिथून जेवणानंतर रोप वे मधून मॅक्लेडगंज साठी गेलो. तिथे दलाई लामा यांचे स्तूप (मॉनेस्ट्री)पाहिली. तिथे बुद्धाची खूप सुंदर मूर्ती आहे. धरमशाला हे बऱ्यापैकी थंड ठिकाण आहे.त्यामुळे स्वेटर, शाल,मफलर,कानटोपी, वगैरे बरोबर असावे.चांगला  "डेडीकेटेड" कॅमेरा असावा. कारण मोबाईल कॅमेरा तेवढे चांगले फोटो घेत नाही. मॅक्लेडगंजचे मार्केट फारसे काही खास वाटले नाही. इथे शॉपिंग करावे असा केसरीने सल्ला दिला होता. संध्याकाळी २ तास तिकडे शॉपिंग साठी ठेवले होते. नंतर भागसू नाग मंदिर पाहिले, पण पुढे धबधबा पाहिला नाही. बाकी कांग्रा व्हॅली, किल्ला, दाल लेक या गोष्टी केसरीच्या प्लॅनमध्ये नव्हत्या. का कोण जाणे. नंतर तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी (ट्रीपच्या पाचवा दिवस) बसने अमृतसरला गेलो. संध्याकाळी गुरू गोविन्द गड येथे लेसर व लाईट शो पाहिला. अमृतसरमध्ये तसे बरेच स्पॉट्स आहेत बघायला. अमृतसर म्हणले की जालियनवाला बाग आलीच.



 खरंतर जालियवाला बाग ही शंभरएक वर्षापूर्वी घडलेली घटना, टु बी करेक्ट १०४ वर्षे.  त्याचे आजच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानी कितपत  महत्व  किंवा जाणीव आजच्या पिढीला आहे/असावे  असे मला वाटत होते. पण इथे एंट्रेन्स पासून प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक घडवली आहे. आत २-३ गॅलरी/मुझियम आहेत. त्यात पंजाबचे स्वातंत्र्यलढ्यातील  योगदान हे फोटो, फिल्म्स द्वारे दाखवले आहे. विजयस्तंभ आहे. विहीर आहे. ग्रॅनाईटचे मोठे स्तंभ  आणि त्यावर वेगवेगळ्या हुतात्म्यांचे  कोट्स लिहलेले आहेत. बाग तशी खूप मोठ्ठी आहे आणि सतत पार्श्वभूमीवर वगैरे सारखी देशभक्तीची गाणी सतत चालू असतात. एकूण  १ तासाचे दर्शन आहे. पण खरोखरच खूप छान बघण्यासारखे आहे. 
 
 मग, आम्ही सुवर्ण मंदिर बघायला गेलो.


 इथे "व्हीआयपी"  पास  वगैरे भानगड नाही. सर्वांनी रांगेत उभे रहायचे. सातच्या आसपास मंदिराचे लायटिंग सुरू करतात. ते खूप छान दिसते.सुवर्णमंदिर परिसरात प्रचंड शॉपिंगसाठी दुकाने आहेत. खूप सुंदर ड्रेस मटेरियल मिळतात. फुलकारी वर्क असलेले ड्रेस मटेरियल असते. पण केसरी टूर मॅनेजरच्या म्हणण्यानुसार इथे बऱ्यापैकी फसवणूक होते. हे मटेरियल दिसत छान असले तरी खराब होते लगेच. त्यापेक्षा मुख्य शहरातील शास्त्री मार्केट परिसरात फुलकारी ड्रेस मटेरिअल चांगले व टिकाऊ असते म्हणे. मंदिरात जायच्याआधी आम्हाला पंजाबी लस्सी पाजण्यात आली. त्याचे कारण, आत रांगेत तासभर उभे रहायचे असते. मंदिराच्या बाजूला लंगर आहे. २४ तास भोजन. केव्हाही जावा, रात्री अपरात्री जेवण चालू असते. आम्ही ६ च्या आसपास गेलो तर जेवण होतेच पण चहा चपाती नाश्ता चालू होता. आम्ही चहा घेतला. सर्व जागा, भांडी वगैरे अगदी स्वच्छ होते. एकूण मंदिराचा परिसर स्वच्छ होता.  एवढ्या मोठ्या प्रमाणात २४ तास अन्नदान इतर भारतात मी कोठेही पाहिले नाही , कदाचित असेलही. दिल्लीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचे एक वर्ष आंदोलन / साखळी उपोषण चालले होते तिथे असेच हे लंगर चालू होते वर्षभर. या लंगर मधील सेवा, तिथले कर्मचारी, तिथे मिळणारे अर्थ सहाय्य .. सगळे अचंबित करणारे होते. 
तिथे आम्ही अमृतसरी रिक्षात बसलो.  


मंदिरापाशी बस, गाड्या जायला अवघड आहे. रिक्षा करावी लागते. त्यात कमीत कमी ८ जण बसवतात. पुढे २, मागे ३ , ड्रायव्हर आणि पॅसेंजर च्या मध्ये आडवी सिट असते - तिथे ३ आणि मागे डिकीत २. एकूण १४०० ते १६०० रुपये घेतात, पर हेड २०० रुपये. यानंतर आमचा स्पॉट होता तो वाघा/अट्टारी बॉर्डर. तिथे रोज संध्याकाळी परेड असते. दोन्ही बाजूची गेट उघडतात. दोन्ही बाजूचे सैनिक परेड करतात. स्पिकरवर मोठ्या आवाजात देशभक्तीपर गाणी चालू असतात. ते कमांडर आपल्याला घोषणा द्यायला लावतात.  प्रेक्षकातील बायकांना खाली बोलावून तिरंगा झेंडा हातात धरून चालायची संधी देतात. नंतर त्यांना गाण्यांवर नाचायला सुद्धा सांगतात. धमाल चालू असते. एकूण ३ तासाचा राष्ट्रभक्तीचा कार्यक्रम असतो. वीर-झारा या चित्रपटाचा क्लायमॅक्स या ठिकाणी चित्रित केला होता. 

शेवटी, आम्ही सद्दा पिंड येथे गेलो. हे एक मुद्दामहून तयार केलेले पंजाबी खेडे आहे. पंजाबी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने ते बनवले आहे. (जयपूर येथे असेच चोखी दानी खेडे आहे.). मक्के की रोटी, सरसो का साग, पंजाबी लस्सी असे इथे मिळते. आणखी बरेच काही आहे.गेम्स, पंजाबी खाटा, जादूचे प्रयोग,  डान्सिंग शो . आरामात अर्धा दिवस निघून जातो.  सात दिवसानी शेवटी आमची ट्रिप संपली. ७ दिवस एकत्र असल्याने सर्वांचा ग्रुप जमला होता. त्यामुळे जाताना ग्रुप फोटोसेशन झाले, एकमेकांचे मोबाईल नंबर देणे - घेणे झाले. येताना आम्ही पुन्हा गो फर्स्टनेच मुंबईला आलो. येताना चक्क फ्लाईट वेळेवर सुटली आणि पोचली. कारण दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये वाचले की गो फर्स्टच्या सर्व फ्लाइट्स रद्द झाल्या, कंपनीने दिवाळखोळी जाहीर केली वगैरे. असो.

 केसरीतर्फे आमची ही पहिली टूर. खरंतर वयाच्या पन्नाशीपर्यंत आम्ही कायमच स्वतः टूर प्लॅन करायचो. ऑनलाईन बुकींगमुळे आता ते सोपंही आहे. पण, ही ट्रीप आम्ही केसरीने केली कारण कंटाळा. कुठे जायचे, भारतात की भारताबाहेर ही चर्चा. मग हॉटेल कुठले, काय बघायचं, फ्लाईट बुकींग, टॅक्सी बुकींग.. अश्या अनेक चर्चा होतात. तेवढा वेळही यावर्षी नव्हता. त्यामुळे फारसा विचार न करता केसरीची टूर बुक केली होती. केसरी टूर्सकडे आमचे थोडे पैसेही यायचे होते. (पूर्वी कोविड काळात बुक केलेली आणि नंतर कॅन्सल केलेली टूर). आणखी एक म्हणजे, मला असे वाटायचे की या टूर कंपन्या आपल्या पर्यटकांना भराभर सगळे स्पॉट्स दाखवतात आणि दमवून टाकतात. पण असे काही निदान केसरी टूर्सबाबत आम्हाला वाटले नाही. निवांत, मजेत प्रत्येक स्पॉटसाठी भरपूर वेळ देऊन आमची ट्रीप झाली. दीड तास नाष्टासाठी, दोन तास जेवणासाठी, संध्याकाळी साडे पाच - सहाच्या आसपास हॉटेलवर परत आणि चहाआणि भजी/ बिस्कीट घेऊन सर्व साईट सीईंग समाप्त. थेट साडे आठ नऊला जेवण. आम्हीच आपले आपले संध्याकाळी हॉटेलवर गेल्यावर चहा घेऊन थोडफार वॉक करून यायचो. आमच्या बरोबर ग्रुपमध्ये ४-५ वेळा केसरीने गेलेले बरेच जण होते. १०-१५ वेळा केसरीने परदेश प्रवास केलेले सुद्धा होते.  एकूण बऱ्यापैकी प्रवासी हे केसरी टूर्स बाबत समाधानी/आनंदी होते . एकूण अनुभव चांगला होता. एखाद्याला फारसा विचार आणि कष्ट न घेता जर ट्रीप करायची असेल तर केसरीने जायला हरकत नाही हा माझा सल्ला. 









Friday, January 13, 2023

Why I write?

 मी का लिहितो ?


मी बरेच काही लिहीत असतो. प्रत्येक लिखाण मी सर्वांना वाचायला देतो असे नाही. काही लेख मी कुणालाच दाखवत नाही. ( काही फक्त एखाद्या वक्तीस किंवा फक्त एका ग्रुपला " शेयर " करतो). किंबहुना खूपसे माझे लिखाण हे मी सोडून कुणीही बघितलेले नाही. असे का? कारण , मी जेव्हा काहीतरी लिहतो, तेव्हा त्याचा मूळ उद्देश हा माझ्या डोक्यात, मनात जे काही चालू असते ते बाहेर काढणे महत्त्वाचे असते. मग काही वेळा ते केवळ मनातील गोष्टींचा नीट मेळ घालण्यासाठी असते तर काही वेळा फार त्रास देणाऱ्या विचारांना बाहेर फेकून देण्यासाठी असते. कधी हे गद्य रुपात येते तर कधी त्याची कविता होते. ते माझ्या हातात नसते. हे मनातून, डोक्यातून आतून असे बाहेर येते ते, चांगलेच असेल हे काही निश्चित नसते. बरेचदा ते सामान्य किंवा वाईट सुद्धा असू शकते. आणि हे लेखन कुणाला आवडेल किंवा नाही याने मला काहीच फरक पडत नाही. मी लिहतो कारण मला लिहीत असताना आनंद मिळतो आणि ते पूर्ण झाल्यावर कुठेतरी आतमध्ये मला एक छान समाधान असते. बरेचदा असे होते की एखादी गोष्ट किंवा प्रसंग आपल्याला खूप भावतो, मग आपण त्याबद्दल काहीतरी लिहतो. ते खूप छान झाले आहे लेखन, असे वाटून मग आपण ते ' शेयर ' करतो इतरांबरोबर. पण त्यांना ते तेवढे आवडत नाही. काहीवेळा तर सोशल मीडिया वर काही रिस्पॉन्सही येत नाही. अश्या वेळी मन खट्टू होते. आपल्याला वाटते की काही खास जमत नाही लिखाण वगैरे. पण, मूलतः आपण का लिहितो हे प्रत्येकाने स्वतः शी ठरवले पाहिजे.  जर मी फक्त माझ्या आनंदासाठी, समाधानासाठी लिहीत असेन तर मग कुणाला ते आवडते का नावडते हे काही महत्त्वाचे नाही. हे लिहणे म्हणजे खरंतर एक स्वतः शी केलेला संवाद असतो. त्यातून आपल्याला काहीतरी स्वतः विषयी नवीन सापडत असते. काहीवेळा लिखाणातून नाती नीट समजतात, गोंधळ दूर होतात.  कधी अडचणींवर मार्ग सापडतो तर कधी पुढे काय करायचे आहे ते समजते. त्यामुळे आपले लेखन हा आपला स्वतः चा शोध  घेण्याचा एक प्रवास असतो हे प्रत्येक लेखकाने समजून घेतले पाहिजे. एकदा हे सर्व केवळ आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी आहे हे कळले, की मग हा प्रवास खूप सुंदर आणि मस्त होऊन जातो. आणि म्हणून मी लिहित असतो.

YHYR

 


 

YHYR (Your health is your responsibility.)

If one looks at any doctor’s clinic, there are so many patients who are visiting the clinic at later stages of diseases. And they expect that a doctor should cure their illness. For example, chronic daily alcoholic, long standing uncontrolled diabetes or blood pressure or chronic smoker/tobacco chewer. In spite of known health hazards of alcohol/tobacco/smoking, people keep on consuming these substances for relief of stress or may be part of their addiction behaviour. Insights about one's own health are very poor in addicted people. But what about others? Diabetics & blood pressure patients and so many others, they keep on delaying medical check-up due to fear or some or other reasons. Such patients land in ICUs directly or even if fortunate enough, then go for consultations at the clinic. These patients are so advanced in their illness that mostly admission or a lot of investigations are needed. Though most are having significant disease related permanent damage, such patients and their relatives are absolutely not aware of the seriousness of the situation. Any advice regarding admission makes them sceptical about the doctor and his intentions. (Thanks to the damaging image of doctors in society)

Along with these, there are other patients who are visiting doctor for various reasons. These people are working and having lot of stressful job, erratic time schedules. When advised about exercise or a proper disciplined eating schedule, these patients are very prompt to say- “No that's impossible for me to exercise" or " my job is such that I may eat lunch at 3,4 or 5 pm or sometimes I skip it. Same about breakfast or dinner. In top of it they consume lot of junk food. After all this unhealthy patterns, still they expect that their illness need to cured by doctor and that to very fast as he/she can't take off from the "precious" job/project. A doctor may advice you diet/exercise schedule & if you say- I can't/it's impossible, he may tell again & again 2-3 times and still you ignore, then he will just give you a nice prescription and he will turn to next pt. That's it. Unless a patient is willing to put efforts in getting cured or unless he is taking the illness seriously, how one can expect a doctor will take it seriously? Paying consultation fees to dr assures you a diagnosis, prescription & advice regarding illness. So, better is to be more proactive about your health, your eating habits your schedule. Try to live a healthy lifestyle, otherwise sooner or later, one will have health issues. Visit to a clinic may give you diagnosis & some treatment, but that's a temporary solution. Finally, you have look at your 24 hours- how you spend, what you eat, which factors give you stress? And then make necessary corrections. Because after all, your health is your responsibility. Any doctor will treat you, help you, support you & guide you through your journey of illness to health. But you have to walk the path. 

वाळवी चित्रपट परीक्षण.

 " वाळवी" चित्रपट परीक्षण.


" वाळवी " अश्या एखाद्या नकोशा वाटणाऱ्या किड्याबद्दल कुणी पिक्चर काढलाय किंवा काढत आहे असे मी ऐकले असते तर डोक्याला हातचं लावला असता. जगात इतकी चांगली नावे असताना हे दळभद्री लक्षण का सुचलं कुणाला असे वाटले असते. पण परेश मोकाशी नावाचा माणूस असा चित्रपट तयार करतो तेव्हा मात्र आपल्याला दाखल घ्यावीच लागते. परेश मोकाशी यांचे आधीचे चित्रपट आठवले तर तुमच्या लक्षात येईल. हरिश्चंद्रची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि व चि सौ कां. तिन्ही मध्ये खूप मोठी अशी गोष्ट नाही पण भरपूर प्रसंग निर्मिती  आणि त्यातून उलगडत जाणारी गोष्ट. तिन्ही चित्रपट चांगले होते. म्हणून मी हा चौथा बघायला गेलो.

 यूट्यूब वर ट्रेलर आहे तो जर तुम्ही बघितला असेल तर गोष्ट काय आहे हे कळले असेलच. ते तसेही फारसे महत्त्वाचे नाही. मोकाशी गोष्ट कशी खुलवून सांगतात ते बघायचे. आधीच्या तीन चित्रपटासारखेच येथे एक कथा आहे. एका खुनाचा प्लॅन. आणि त्यातून घडणारे कथानक. स्वप्नील जोशी सुबोध भावे अनिता दाते शिवानी सुर्वे अशी ४ मुख्य पात्र ( आणि खरतर तेवढीच पात्र आहेत). साधारणपणे २४ तासात घडणारी गोष्ट.  पण सुरवातीपासून शेवटपर्यंत जे काही पडद्यावर चालू असते ते निव्वळ भन्नाट. एखादा माणूस असं काहीतरी करू शकतो आणि त्याला वाळवी असलं विचित्र किड्याचे नाव देऊन तो चित्रपट थिएटर मध्ये लावू शकतो हेच मानलं पाहिजे. 

चित्रपटाची अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत मांडणी इतकी व्यवस्थित आणि सुसंगत आहे की पहिल्या भागात घडत जाणाऱ्या गोष्टीला मध्यंतरात जेव्हा ब्रेक येतो तेव्हा चित्रपटातल्या पात्रांवरोबर प्रेक्षक ही बुचकळ्यात पडतो. आणि आता पुढे काय ? असा प्रश्न पडतो. मध्यंतरानंतर चित्रपट जो सुरू होती आणि एकामागोमाग एक अश्या घटना घडत जातात की मती गुंग होते. आणि शेवटी एका अनपेक्षित शेवट होऊन अचानक पिक्चर संपतो. वेगाने घडणारे कथानक असे थांबते की प्रेक्षक अवाक होतात. 

सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय झाला आहे. कुठेही मेलोड्रामा नाही. जास्त कलाकाराचा मेक अप नाही. गाणी नाहीत. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे तर कसलेले अभिनेते आहेतच, पण तुलनेने ज्युनिअर आणि नवीन असलेल्या शिवानी सूर्वेनी ही डेंटिस्ट च्या भूमिकेत झकास काम केले आहे. अनिता दातेना वाव खूप कमी आहे. संकलन, पार्श्व संगीत, कथा व इतर तांत्रिक बाजू झी ची निर्मिती असल्याने उत्तम आहेतच. 

एकूण काय, ही "वाळवी " अनुभवण्यास नक्की जा. तुम्हाला परेश मोकशीचे आधीचे तिन्ही चित्रपट आवडले असतील तर हा तुम्ही नक्की एन्जॉय कराल. एकदम छान चित्रपट.